शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी नुकसान भरपाई करणार सरकार जमा इथे तपासा यादीत आपले नाव

नमस्कार मित्रांनो अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने निधी वाटप करण्यास मान्यता दिली आहे.

जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे राज्याचे नुकसान झाले होते, त्यामुळे निधीची मागणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता, त्यानुसार राज्य सरकारने निधीच्या वितरणास मान्यता दिली आहे. नुकसान भरपाईसाठी ५९६ कोटी २१ लाख ५५ हजार रुपये. यामुळे जानेवारी ते मे 2024 दरम्यान अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीपासून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

हे सुद्धा बघा : या विद्यार्थ्यांच्या खात्यावर होणार साठ हजार रुपये जमा अशाप्रकारे करा अर्ज

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार या सहा महिन्यांत एकूण 2 लाख 17 हजार 690 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात ३ लाख ५४ हजार ७६५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसान भरपाईची रक्कम डीबीटी पोर्टलद्वारे थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.2 हेक्टरची मर्यादा वाढवून 3 हेक्टर करण्यात आल्याचेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना 3 हेक्टर मर्यादेपर्यंत पैसे मिळू शकणार आहेत. यामध्ये महसूल विभागाच्या दिनांक 1 जानेवारी 2024 च्या निर्णयानुसार मदत दिली जाईल. म्हणजे 3 हेक्टर मर्यादेत, लागवडीयोग्य पिकांसाठी प्रति हेक्टर 13,600 रुपये, बागायती पिकांसाठी प्रति हेक्टर 27,000 रुपये, बारमाही पिकांसाठी प्रति हेक्टर 36,000 रु. जानेवारी ते मे या कालावधीत राज्यातील विविध भागात पाऊस झाला. त्यामुळे रब्बी व उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे पिके जमीनदोस्त झाली. 

Leave a Comment