शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम या दिवशी होणार खात्यात जमा

नमस्कार मित्रांनो राज्यात नोव्हेंबर, २०२३ ते जुलै, २०२४ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे.

अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने तीनशे सात कोटी पंचवीस लक्ष एकोणतीस हजाराच्या मदतीचा निधी वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे.निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळणार असून याबाबतचा शासन निर्णय ५ सप्टेंबर २०२४ रोजी जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

हे सुद्धा बघा : ग्राहकांना मोठा दिलासा.! आता 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार फक्त एवढे रुपये जाणून घ्या ताजे नवीन दर

मदत, पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले, दि. २२.६.२०२३ च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट झाली.यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.

हे सुद्धा बघा : ग्राहकांना मोठा दिलासा.! आता 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार फक्त एवढे रुपये जाणून घ्या ताजे नवीन दर

Leave a Comment