मोदी सरकारचा मोठा निर्णय.! आता या नागरिकांना सुद्धा देखील मिळणार मोफत आयुष्मान भारत कार्ड

नमस्कार मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत वृद्धांसाठी मोठी निर्णय घेण्यात आला आहे. आता ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व वृद्धांना आयुष्मान आरोग्य योजनेंतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ही एक नवीन श्रेणी असेल. या अंतर्गत सरकार ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधेसह आरोग्य विमा देणार आहे ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज असेल.

हे सुद्धा बघा : लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये या दिवशी होणार जमा येथे बघा यादीत नाव

 

एकूण १२.३ कोटी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. जी कुटुंबे आधीच आयुष्मान भारत योजनेचा भाग आहेत, त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती ७० वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास, त्यांना वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त टॉप-अप मिळेल. हे शेयर्ड आरोग्य कवच असेल, असंही मंत्री अश्विन वैष्णव म्हणाले.वृद्धांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या या सुविधेचा फायदा सुमारे ४.५ कोटी कुटुंबांना तसेच ६ कोटी ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.

Leave a Comment